पुजेत व मंगलकार्य मध्ये केळा चे महत्व का आहे?
केळा चे झाड हे शापित झाड आहे!!!!
ऋशी दुर्वासा यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळाचे झाड आहे!
ही अख्यायिका अशी आहे की...
ऋशी दुर्वासा हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रम्हमुहुर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे होते.
थकून भागून आल्या मुळे ब्रम्हमुहुर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रम्हमुहुर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले पण ऋशी पत्नी कंदिनी ला ही ब्रम्हमुहुर्तावर जाग आली नाही...
जेव्हा सुर्य वर आला तेव्हा ऋशी ना जाग आली व ब्रम्हमुहुर्तावर आपणास पत्नी ने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला...
आपले अनुष्ठान मध्ये बाधा आल्या मुळे ते क्रोधीत होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला...
ऋशी पत्नी कंदिनी राख होऊन पडली...
ही गोष्ट कंदिनी चे पिता ऋशी अंबरीश यांना समजली...
ते दुःखी होऊन त्या राखे कडे पाहू लागले...
ऋशी दुर्वासा पित्या समान आपल्या सासऱ्याचे क्षमा मागू लागले...
ऋशी अंबरीश यांनी ऋशी दुर्वासा यांना कंदीनी स शाप मुक्ती साठी वृक्ष होण्याचा वरदान द्यावे अशी विनंती केली...
त्या प्रमाणे ऋशी दुर्वासा यांनी त्या राखेतून एक केळाचे वृक्ष निर्माण केले व वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगलकार्य,पुजा, अनुष्ठान होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ व पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल...
तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल...
म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळाचे व केळाचेपान व खोड याचा समावेश होऊ लागला...
केळास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे...
डाॅ. उदय तेलकर -पुणे
No comments:
Post a Comment